Home Uncategorised कल्याणच्या चायनीज सेंटरमधून 5 बांग्लादेशींना अटक; 5 वर्षांपासून कल्याणात वास्तव्य?

कल्याणच्या चायनीज सेंटरमधून 5 बांग्लादेशींना अटक; 5 वर्षांपासून कल्याणात वास्तव्य?

 

कल्याण दि.3 जानेवारी :
कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी कल्याण पश्चिम परिसरातील दोन चायनीज सेंटरवर छापेमारी करून 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याणात बांगलादेशी नागरिकांचे वास्तव असल्याचे उघड झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
तोहीद शेख , जलाल उर्फ दुलाल मियाँ , इमोन खान ,सोहेल लाला मियाँ , मुनीर खान अशी या 5 बांग्लादेशी नागरिकांची नावे आहेत. हे पाचही बांग्लादेशी नागरिक गेल्या 5 ते 7 वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याची माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे. तर विशेष म्हणजे हे बांगलादेशी नागरिक चायनीज सेंटर आणि हॉटेलमध्ये कुक, वेटर आणि मॅनेजर म्हणून कार्यरत होते. या पाचही बांगलादेशी नागरिकांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकारानंतर बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आणखी काही नागरिकही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वांना हुडकून परत पाठवण्याचे पोलीस प्रशासनासमोर खरे आव्हान आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा