Home Uncategorised काटई येथील टोलनाका कायमस्वरुपी बंद करा – मनसे आमदार राजू पाटील यांची...

काटई येथील टोलनाका कायमस्वरुपी बंद करा – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

 

डोंबिवली दि. 21 सप्टेंबर :
कल्याण-शिळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांनी याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री बनसोडे यांना दिले असून त्यात ही मागणी केली आहे.

कल्याण-शिळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यावर काटई येथे टोल आकारणी सुरु होती. परंतु सध्या एमएसआरडीसीकडून या २१ कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरु असून या रस्त्यासाठी १९८ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. रस्त्याचे काम सुरु असल्याने टोल आकारणी पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून हा टोलनाका आता कायमस्वरुपी बंद करण्याची आवश्यकता आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अवघ्या १९८ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी प्रवाशांना भविष्यात टोलचा भुर्दंड लावणे योग्य नसून महाराष्ट्रात आधीच बऱ्याच ठिकाणी टोलनाके सुरु आहेत. अशाप्रकारच्या कमी खर्चाच्या रस्त्यावर टोल आकारणी करणे योग्य होणार नसल्याने कल्याण-शिळ रस्त्यासाठी मंजूर निधीची शासनाने पूर्तता करुन कायमस्वरुपी हा टोल बंद करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा