Home ठळक बातम्या कल्याणच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग

कल्याणच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग

कल्याण दि.५ एप्रिल :

कल्याणच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी आहे की केडीएमसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीशी झुंजत आहेत.

कल्याण पश्चिमेतील बारावे गाव परिसरात केडीएमसीचा हा घन कचरा प्रकल्प आहे. दोन आठवड्यांपूर्वीही या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागण्याची घटना घडली होती. मात्र ही आग पहाटेच्या सुमारास लागली होती तर आज दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे.

याठिकाणी ही आग नेमकी कशामुळे लागलीय याची माहिती मात्र समजू शकली नाही. विशेष म्हणजे याठिकाणी असणाऱ्या सुक्या कचऱ्याने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा