Home ठळक बातम्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांकडून पाहणी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांकडून पाहणी

 

 

डोंबिवली दि.7 मार्च :
जुन्या मुंबई पुणे महार्गावरील दहिसर ते शिळफाटा दरम्यान महामार्गा लगत प्रचंड अतिक्रमण झाली असून यामुळे तब्बल ३२ नैसर्गिक नाले बंद झाले आहेत. तर नाल्यांमधील हे पाणी महामार्गावर येऊन अपघातांची मालिका सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती. यानंतर ठाणे तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आमदार राजू पाटील ,तहसीलदार युवराज बांगर यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत या भागाची पाहणी केली आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील दहिसर ते शिळफाटा दरम्यान असलेल्या ३२ नैसर्गिक नाल्यांचे पुनर्जिवीकरण करण्याचा निश्चय आमदार राजू पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले बंद असल्याने नाल्यांमधील पाणी पावसाळयात महामार्गावर येऊन अपघात घडत आहेत. तर भंगार माफियांकडूनही रासायनिक पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नाल्या सोडले जाते. यामुळे १४ गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेती नापीक होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच हे रसायन मिश्रित पाणी १४ गावांमध्येही जात असल्याने विहिरी आणि बोअरवेलचे पाणीदेखील प्रदूषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर १४ गावांची प्रदूषणातून आणि वाहनचालकांची अपघातांच्या गर्तेतून मुक्तता करण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि प्रशासक, आयआरबी कंपनीचे अधिकारी यांच्यासह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षद पाटील, विभागाध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील आदी जणांच्या उपस्थितीत शनिवारी महामार्गावरील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. तर लवकरच महामार्गावरील ही अतिक्रमणे दूर करण्याचे आश्वासन तहसीलदार युवराज बांगर यांनी दिले आहे.

कल्याण शिळ रोडवरील वाहतूक कोंडीस अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेत झालेल्या बैठकीतही अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न आमदार उपस्थित झाला होता. वाहतूक कोंडी होत असल्याने आणि शासनाच्या कामात अडथळा ठरत असलेली अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

१ कॉमेंट

Leave a Reply to गोपाळ पिल्लई प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा