Home ठळक बातम्या शिवसेनेच्या टिकेला मनसे आमदार राजू पाटील यांचेही प्रत्युत्तर

शिवसेनेच्या टिकेला मनसे आमदार राजू पाटील यांचेही प्रत्युत्तर

 

डोंबिवली दि.6 ऑगस्ट :
रस्त्याच्या निधी मंजुरीच्या कामावरून शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू झालेला कलगीतुरा काही थांबायचे नाव घेत नाहीये. शिवसेनेने केलेल्या जोरदार टिकेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनीही शिवसेनेच्या या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मानपाडा येथील रस्त्यासाठी मंजूर झालेल्या निधीवरून मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. या पत्रकार परिषदेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनीही मग या शिवसेनेच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणत आहेत आमदार राजू पाटील…

लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीनुसार विकेंद्रीकरण केलेले आहे. उदा. खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य अगदी ग्रामपंचायतपर्यंत, प्रत्येकाला लोकप्रतिनिधीचा दर्जा देऊन अधिकार असतात. त्यामध्ये व्यापक रहायचे असते इथे खासदार मात्र आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद अगदी ग्रामपंचायतमधील कामामध्ये श्रेय घेण्यासाठी हस्तक्षेप करताना दिसत असल्याची टिका आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय दर्जाचे प्रकल्प आणून विकासासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज असताना असे होताना दिसत नसल्याचेही आमदार पाटील यांचे म्हणणे आहे. तर एवढी वर्षे सत्तेत असतानाही श्रेयासाठी इतर लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून श्रेय घेणे शोभादायक नाही. विधानसभा बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यातील जे रस्ते मंजूर होतात, ते मुख्यत्वे स्थानिक आमदारांच्या शिफारशीने होतात. कारण आमदार हे विधानसभेत नेतृत्व करीत असतात आणि संसदेत मंजूर होणारी कामे खासदार सुचवत असतात. त्यामुळे इतरांच्या कामात हस्तक्षेप करून श्रेय घेण्याचा प्रयत्न न करता पदाच्या मर्यादा ठेऊन खासदरकीवरून खाली येऊ नये, वरच्या पायऱ्या चढाव्यात असेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा