Home ठळक बातम्या सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा मात्र सर्व काही खपवून घेऊ घेणार नाही –...

सरकारला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा मात्र सर्व काही खपवून घेऊ घेणार नाही – मनसे आमदार राजू पाटील

 

डोंबिवली दि.९ ऑगस्ट :
कल्याण ग्रामीण भागात रखडलेली रस्त्यांची कामे, झालेली दुरावस्था यावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलं आहे. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला असून याचा अर्थ जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ असा नाही. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार असे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रखडलेले रस्ते आणि रस्त्यांची दुरावस्था याबाबत पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलं आहे. एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाटले तरी अद्याप कामे सुरू झाली नाहीत. आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असं नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणी तरी बोलायला पाहिजे ,ते आम्ही बोलतोय, यामागे कोणावर टीका करायची नाही तर या कामांकडे त्यांनी लक्ष द्यावे अशी भावना असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

पाऊस जोरात होता त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र डोंबिवली कल्याणमध्ये तसे कुठेही झालं नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जात आहेत. इथे प्रशासक आहे , लोकप्रतिनिधी नाहीत,राज्यात मंत्रीमंडळ नाही , ४० दिवस झाले, दाद मागायची कुठे ? ठाण्याचे मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत एवढीच अपेक्षा असल्याचे आमदार राजू पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा