Home ठळक बातम्या महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे पोलीस बांधवांसाठी अनोखी भेट

महाराष्ट्र दिनानिमित्त भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे पोलीस बांधवांसाठी अनोखी भेट

 

डोंबिवली दि.1 मे :
भाऊ चौधरी फाउंडेशन आणि आराध्या ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने सावळाराम क्रीडा संकुल येथे २९ एप्रिल ते १ मे ‘मिसळ महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. खाद्यप्रेमींनी या महोत्सवाला अक्षरशः डोक्यावर घेतल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. तर ६२ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त अभिषेक भाऊसाहेब चौधरी यांच्या माध्यमातून मानपाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अनोख्या मिसळ पावच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

खाद्य महोत्सवसारखे अनेक कार्यक्रम शहरात होत असतात. प्रत्येक सोहळा, कार्यक्रमांना नेहमी पोलीस कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि सहकार्य लाभते. मात्र कामाचे तास आणि कर्तव्यामुळे त्यांना महोत्सवात उपलब्ध विविध खाद्य पदार्थांचे स्वाद घेता येत नाही. हाच धागा पकडून या मिसळ महोत्सवातील विविध चविष्ट मिसळीची चव पोलिस बांधवांनाही चाखता येण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अभिषेक चौधरी यांनी दिली.

दरम्यान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जावई मल्हार राजेश नार्वेकर समवेत या मिसळ महोत्सवाला भेट देत मिसळीची चव चाखली. या महोत्सवाला डोंबिवली आणि कल्याणमधील रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा