Home ठळक बातम्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर पूर्वीपेक्षा अधिक त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही तितकीच दक्षता घेण्याची गरज...

इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर पूर्वीपेक्षा अधिक त्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही तितकीच दक्षता घेण्याची गरज व्यक्त 

 राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाकडून चर्चासत्राचे आयोजन

कल्याण दि.27 जून :

सध्याच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणावर होत असल्याने विद्युत कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनीही अधिक दक्षता घेण्याची गरज आजच्या चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आली ,राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यामार्फत आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या महानगरपालिकांचे कार्यकारी अभियंता, विद्युत कर्मचारी, विद्युत कंत्राटदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. (The use of electrical appliances is more than ever, so it is necessary for employees and citizens to be equally vigilant)

भलेही आज सुरक्षेची अनेक उपकरणे आणि माध्यमे उपलब्ध झाली असली तरी विजेशी संबंधित कोणतेही काम करताना विद्युत कर्मचाऱ्यांनी खबरदारी आणि काळजी घेणे आवश्यकच आहे. कारण लहान लहान गोष्टींमधूनच मोठमोठ्या घटना आणि अपघात घडत असल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले.

आताच्या काळामध्ये घराच्या इंटिरिअरकडे जितके लक्ष दिले जाते तितकेच घरातील वायरिंगकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित करण्यात आला. तर विद्युत वाहिनीचे काम करताना कितीही जुने आणि जाणते कर्मचारी अधिकारी असलात तरीही शॉक हा तुम्हाला सांगून लागत नाही. त्यामुळे काम करताना आपण सतत खबरदारी आणि दक्षता बाळगणे ही अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यासोबतच वीज मीटर फेजिंग आणि मुख्य वायरिंग, घरापासून मीटरपर्यंत येणारी वायर, काम करताना घ्यायची काळजी, पॅनलवर काम करताना घ्यायची काळजी, कोणती उपकरणे वापरावी, शॉर्ट सर्किटमुळे लागणारी आग, इमारतीमधील फायर फायटर यंत्रणेचे पॅनल, त्याची तपासणी, आरसीसीबी उपकरणाची गरज, एफआरएलएसएच केबलचे महत्त्व, आर्थिंग, अशा अनेक लहान मोठ्या मुद्द्यांवर महाराष्ट्र शासनाचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे, जाधव यांच्यासह इतर तज्ञ व्यक्तींकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच वीज वापर आणि सुरक्षिततेबाबत भारत सरकारने नव्याने लागू केलेला सेंट्रल इलेक्ट्रिकल ऍक्ट आणि त्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे लेखापरीक्षक लक्ष्मण पाटील, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, राष्ट्रीय उत्पादकता परिषदेचे माजी संचालक टी. शंकर नारायण, महाराष्ट्राचे विद्युत निरीक्षक आर आर यादव, सहनिरीक्षक भूषण मानकामे यांच्यासह यशवंत पाटील, कार्यकारी अभियंता राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा