Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला आमचा विरोध नाही मात्र ते साडे सहा हजार कोटी...

कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला आमचा विरोध नाही मात्र ते साडे सहा हजार कोटी कुठे गेले? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांचा सवाल

 

कल्याण डोंबिवली दि.9 जून :
कल्याण डोंबिवली शहरे ही स्वच्छ झालीच पाहिजेत त्याला आमचा विरोध नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर केलेले साडे सहा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भिवंडी लोकसभेचे संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी केला आहे. केडीएमसी प्रशासनाने केलेल्या कचरा संकलन करवाढीविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

केडीएमसी प्रशासनाने कोणतेही कर आणि त्याचे दर निश्चित न करता कचरा संकलन शुल्कात वाढ केली आहे. यामुळे नागरिकांवर निश्चितच कराचा मोठा बोजा बसणार असून त्यामुळेच केडीएमसी प्रशासनाने ही शुल्कवाढ मागे घेण्याची आग्रही मागणी शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2015 च्या केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्यासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोणताही विरोध नाही. मात्र मग देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले हे साडे सहा कोटी रुपयांचे काय असा प्रश्न साईनाथ तारे यांनी उपस्थित केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा