Home ठळक बातम्या पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांचा पदोन्नती सत्कार सोहळा दिमाखात संपन्न

पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांचा पदोन्नती सत्कार सोहळा दिमाखात संपन्न

कल्याण सिटीजन फोरमच्या पुढाकाराने आयोजन

कल्याण दि.18 जून :
कल्यसंपन् सामाजिक भान लाभलेले पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. त्याबद्दल कल्याण सिटीजन फोरमच्या माध्यमातून आयोजित त्यांचा पदोन्नती सत्कार सोहळा अत्यंत दिमाखात संपन्न झाला. येथील सोनावणे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याला कल्याणातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. यावेळी अर्जुन डोमाडे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी या दोघांनाही गौरवण्यात आले.

एक सामान्य शेतकरी कुटुंब, वडील माथाडी कामगार आणि आई भाजी विक्रेती. अशा कष्टाळू कुटुंबामध्ये अर्जुन डोमाडे यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असतानाही प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते पोलीस खात्यात रुजू झाले. पोलीस खात्यातील ही अतिशय दगदगीची आणि प्रचंड कामाचा व्याप असलेली नोकरी करून त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे सांभाळली. इतकेच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्येही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. आपल्यातील लिखाण, साहित्याची आवडही अतिशय उत्कृष्टपणे पूर्ण करून त्यांनी आपल्यातील अष्टपैलू व्यक्तीमत्व सिद्ध केले. परंतु याचा कोणताही बाऊ किंवा बडेजावा न दाखवता ते कल्याणच्या कर्मभूमीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे.

यासोबतच सामाजिक संवेदना जपत आपल्यातील सामाजिक कार्यकर्ताही त्यांनी अतिशय उत्तमरित्या जपल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच तर अनेकविध सामाजिक संस्थाचे ते संस्थापक आहेत. कल्याण सिटीझन फोरम, मानव सेवा संघ, खंडेराय सेवा समिती, पु .ल. कट्टा ,अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याणातील साहित्य चळवळ अशा संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत. या संस्था नावारुपाला आणण्यामध्ये त्यांच्यासह त्यांचे बंधुतुल्य मित्र किशोर खराटे यांचाही मोलाचा वाटा आहे.

अगरवाल कॉलेजचे अध्यक्ष विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सादभाई काझी, प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक शंकर आव्हाड, प्रसिद्ध कवी आणि लेखक अरुण म्हात्रे, रेखा मेड, अनिल पंडित , लेखक आणि कवी रवींद्र लाखे, प्रसिद्ध अभिनेते , लेखक आणि दिग्दर्शक राम दौंड, अनंत गवळी यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनंत गवळी , सादभाई काझी, प्रशांत तोष्णीवाल ,संजय वाजपेयी, वसंत आव्हाड, दामोदर काबरा , दत्ता केंबुळकर सुनील डोके यांनी परिश्रम घेतले. तसेच कल्याण सिटीजन फोरमचे सर्व पदाधिकारी आणि मित्रपरिवारानेही मदत केली.

(सोहळा माहिती सौजन्य : श्री. वसंत आव्हाड)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा