Home कोरोना मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही...

मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही होतील – आमदार गणपत गायकवाड

कल्याण दि.28 जानेवारी :
मनामध्ये डिस्टन्स ठेवले नाही तर शहराचा चांगला विकासही होईल आणि चांगली कामेही होतील असे मत कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केलेल्या सोशल डिस्ट्न्स असले तरी मनात कोणतेही डिस्टन्स ठेऊ नका’ या वक्तव्याबाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी हे मत व्यक्त केले. कल्याण पूर्वेतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
कल्याण पूर्वेमध्ये असणाऱ्या कचरा, पाणी पुरवठा, पुना लिंक रोडवरील सतत तुटणारी झाकणं, गार्डनची व्यवस्थित न होणारी देखभाल दुरुस्ती, स्ट्रीट लाईट अशा विविध समस्यांबाबत आपली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर 100 फूट रस्त्यावरील माधव अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी चर्चा झाली. ही इमारत तोडल्यावर 100 फूटी रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान कल्याण पूर्वेत रेल्वे परिसर असणाऱ्या ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू असून उर्वरित भाग ताब्यात आल्यावर त्याठिकाणीदेखील विकासकामे सुरू होतील असा विश्वासही आमदार गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केडीएमसीचा पदभार घेतला आणि पाठोपाठ कोरोनाची समस्या आली. त्यामुळे एवढे महिने नागरी समस्यांबाबत त्यांच्याशी नीट चर्चा करता आली नाही म्हणून आपण आज त्यांची भेट घेतल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा